
आपुले घरटे सख्या ते चन्द्रमौळी..
पावसातून कालच्या वाहून गेले,
सांधण्याचा डावही फ़सवा निघाला..
भग्न्न त्या खाणाखुणा पाहून गेले,
आसवानी कोरडा आकांत केला..
गोठल्या रक्तात मी नाहून गेले,
घाव जखमांचे उराशी साचलेले..
गंजल्या वज्रापरि साहून गेले,
मीच माझे एकटीने सोसले जे..
ते तुला सांगायचे राहून गेले...!!!
No comments:
Post a Comment