
क्षितीजावरती विखरुन गेले लाल केशरी रंग..
निळ्या आभाळावरी उमटले रुधिराचे तरंग..
क्षणात रजनी मावळली अन दिशा प्रकाशित झाल्या..
लगबग झाली सृष्टीची अरुणोदय समीप आला..
पायघड्या धरणीच्या आणिक सागर घाली स्न्नान..
प्रभात समयी वसुंधरेवर भूपाळीचे गान..
अर्घ्य म्हणून मग मीही माझे काव्य समर्पण केले..
काव्यामधल्या प्रतिभेला रवी चरणी अर्पण केले..
तेव्हापासून ओंजळीत तेजाची कवने झाली..
नव्या प्रभाती नवे काव्य रचण्याची उमेद आली..!!!
No comments:
Post a Comment