
विसरायाचे आहे सारे स्मरु कशाला.. ??
आठवणींच्या रिक्त पोकळ्या.. भरु कशाला ..??
घडून गेले बरेच ... तरीही घडते आहे...
गतकाळाच्या सुप्त सावल्या... धरु कशाला..??
कळले जेव्हा चुकले.. तेव्हा शहाणी झाले..
व्यर्थ चुकांचे हिशोब पुन्हा.. करु कशाला..??
स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??
आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??
1 comment:
jagaave apulyaaparii.. aayushy sundar aste ase loka mhantyaat..!!!
Post a Comment