Tuesday, January 22, 2008

प्रवास...


नव्हते सवे कुणीही ... एकांतवास होता..
मी चालले तरीही .. तोही प्रवास होता..

होतास सोबतीला होऊन सावली तू..
तेव्हा कुठे कळ्यांच्या गात्री सुवास होता..

आता फुले कळ्यांची आहेत ओंजळीशी..
पण गंध वेचणारा तो ''तू'' हवास होता..

गंधातला बिलोरी तो स्पर्श आज नाही...
साराच प्राक्तनाचा.. फसवा आभास होता...

काटेच आज माझ्या वाटेत सांडलेले..
व्हावा सराव त्यांचा इतुका प्रयास होता...!!!!!!!

1 comment:

नचिकेत जोशी said...

Your Poems are really touchy...
They show ur thinking, ur maturity...
God Bless u...
Keep writing....

Nachiket