
धुमसु लागतात शब्द मनात एकाएकी ,,
आणि भावनांचा उद्रेक होतो........
धगधगत्या अतृप्त इच्छा पेटून उठतात अवेळीच
आणि स्वप्नांचा शेवट होतो॥
पसरु लागतो अविचाराचा वणवा रानोमाळ...
आणि जळत जातात नव्याने पालवलेली आशेची कोवळी झाड
...भस्मसात होत एका क्षणात
वर्षानुवर्ष जपलेल अस्तित्वाच चैतन्य .... कर्तृत्वाच लावण्य ...
वक्तृत्वाच नैपुण्य आणि बरच काही .....
मागे उरतो तो फ़क्त राखेचा सडा...
"आपण जन्मलो होतो केव्हातरी ..... याची आठवण करून देणारा...!!
म्हटला तर नगण्य ...
म्हटल तर तेवढच काय ते पुण्य...
निदान मरताना तरी आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा का होइंना ॥
आहेत मागे...
बस यातच समाधान... !!
सगळी धडपड केवळ स्वत्वासाठी॥
"मी" " माझ" " मला" माझ्यामुळे" " माझ्यासाठी" ....
सगळी लढाई फक्त या स्वार्थासाठी ॥
छे.... छे... स्वत्वासाठी ॥
लुटुपु
टुची असंख्य द्वंद्व मनात निरंतर सुरु असतात.....
कधी मी जिंकते... तर कधी मीच हरते ...
पण प्रत्येक वेळी जन्माला येत ते... माझच॥
अबाधित अस्तित्व ....
" कवितेच्या रुपाने" !!!!......