
जेव्हा वाटतं की..... तू असावस जवळ.. घटकाभर
आणि ओळखावास.. व्यथांनी भिजलेला माझा हळवा स्वर..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!
जेव्हा वाटतं की..... तू समजून घ्यावस सारं काही..
जाणावस नजरेतूनच.. अव्यक्त शब्दांनाही..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!
जेव्हा वाटतं की..... तू ऐकावीस माझी कविता..
अगदी मुग्ध होऊन..
आणि करावस प्रतिभेला प्रेरीत.. मोकळी दाद देऊन..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!
जेव्हा वाटतं की..... तुझी उणीव अगदी असह्य होतेय..
क्षण न क्षण सुना भासतो..
नेमकं तेव्हाच .. जे जे वाटतं ते ते सारं शब्दरूप होतं..
कवितेतून..
मन हलकं होतं.. व्यथा बोलक्या होतात..
जाणीवांना जाग येते..
नव्हे.. जाणीवांची जाणीव होते..
पण तरीही मन खंतावतच...
कारण..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!
1 comment:
सुंदर
Post a Comment