
बोलायाचे नव्हते काही..
पण मौन पाळता आले नाही..
शब्दच वेडे फितुर होते..
की अश्रू गिळता आले नाही..
तुझी ओळख पटते तेव्हाच
परकेपणा बोलका होतो..
पण संवादाची ओढ अजब
बोलणे टाळता आले नाही..
आजसुद्धा रोजच्यासारखे
कुलुपबंद ओठ होते..
पण निर्विकार चेहरा ठेवून
हास्य गाळता आले नाही..
अन दोन शब्द तुझे जेव्हा
अवचित आले कानावर..
तोच सार्या अटी विलग करून..
दूर पळता आले नाही..
पुन्हा पुढल्या शब्दासाठी..
वाट पाहणे मंजूर होते..
शब्दांचीच चाकरी बरी..
शून्यात वळता आले नाही..!!!
1 comment:
पण निर्विकार चेहरा ठेवून
हास्य गाळता आले नाही.. >> very painful words !!
शब्दांचीच चाकरी बरी..
शून्यात वळता आले नाही..!!!
>> that shows uvr greatness!!
pan tuzya saglyaa kavitaa pahilyaa tar hee ek common kavita vaatate.. as u wrote dozens of poems (ultimate ones) like this before..
Post a Comment