
अक्षम्य चुका टाळता आल्या असत्या तर..
किती बरं झालं असतं..
तुला भेटणंच मी सर्वात आधी टाळलं असतं !
मग....
सगळे संदर्भ आपोआपच टळले असते.
छे..
पण असं ठरवल्या प्रमाणे घडतं का कधी..?
अगदी मोजून मापून... पाउल पडतं का कधी..?
नियतीच्या भेटीगाठी विधीलिखित असतात म्हणे..
म्हणूनच की काय..
आयुष्यात फक्त लिहिता येतं..
पुसता नाही.. !!!
No comments:
Post a Comment