
पूर्णतेचा ध्यास कायम असला तरी..
स्वप्नांच्या व्यथा अधुर्याच राहतात..
कक्षेच्या बाहेर अपेक्षा रुंदावतात..आणि
जीवनाच्या कथा अपुर्याच राहतात..
लिहायचं असतं खूप काही..
आयुष्य अधोरेखीत करेल असं..
पुसायचं नसतंच.. कधीच नाही..
रेखायचं चिरंतन ठरेल असं..
पण.. नव्याने डाव मांडता मांडता..
जुने ते घाव तसेच राहतात..
जिंकण्याचा हट्ट करता करता..
हरण्याचा सराव करुन पाहतात..!!!

