कालच मीराचा फोन आला. मीराची आणि माझी ओळख तशी हल्लीचीच. माझ्याच डॉक्टर मैत्रिणीच्या रेफरन्सने ती माझ्या कडे येऊ लागली.. हल्ली ती वरचेवर आजारी पडायची. तिला यातून बाहेर पडायचं होतं. तशी मीरा एका सुखवस्तू जैन मारवाडी कुटुंबात वाढलेली आई वडिलांची दोन मुलीपैकी मोठी लाडाची मुलगी. खाण्या पिण्याला तोटा नाही. एका मल्टीनॅशल कम्पनीत चांगल्या हुद्यावर ती कार्यरत आहे. आणि आता लग्नाचं वय झाल्या मुळे घरी युद्ध पातळीवर मुलं दाखवण्याचा कार्यक्रमही होत असे.
मीरा तशी शांत आणि सुस्वभावी, नक्षत्रा सारखी देखणी. उगाच कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी. ऑफिस मधील लोकांना ती शिष्ट वाटे. पण तिला पाहिलं की नेहमी जाणवायचं हिच्या मनावर कसलं तरी दडपण आहे. एवढ़ी मोठी मुलगी पण नेहमी आई सोबतच क्लिनिक ला यायची. खरं तर आईच्या काळजाचा तुकडाच होती ती. केस च्या निमित्ताने खूप विश्वासाने तिनं माझ्याशी हे शेअर केलं होतं की तिला एक मुलगा आवडतो. तो तिच्या जुन्या ऑफिस मध्ये होता. सॉफ्टवेअर इंजिनीअर. दोघांचं खूप चांगलं पटायचं. ५-६ वर्षांची ओळख. त्यामुळे दोघांमध्ये खूप छान बॉण्डिंग होतं. अजून ही आहे. मी म्हटलं "अरे वाह.. मग लग्न का नाही करत त्याच्याशी?" ती म्हणाली "ते शक्य नाही. कारण तो मुसलमान आहे. आईला मी हे सांगितलं कारण बाबांना सांगायची हिम्मत नव्हती. पण आई ने स्पष्ट नकार दिला. समाज काय म्हणेल. आपल्याला वाळीत टाकतील लोक. आणि अजून धाकटी आहेच पाठीवर. स्वत:चा नाही तर निदान बहिणीचा तरी विचार कर. म्हणून मी लग्नाचा विचार सोडला. पण अजून त्याला सोडता येत नाहीये."
एखाद्या हिंदी पिक्चरला साजेशी अशी तिची कहाणी. मी तिला इतकंच म्हटलं, "जो वर तो तुझ्या आयुष्यात आहे तोवर कुठलाच दुसरा मुलगा तुला आवडणार नाही. त्या मुळे पुढे जाऊन कुठलंही पाऊल उचलशील तर विचार पूर्वक उचल. भावनेच्या भरात नाही. दोन भिन्न जातीय कुटुंबात सगळ्यात जास्त तडजोड तुलाच करावी लागेल. त्यामुळे आई वडिलांची काळजी स्वाभाविक आहे. त्यांना विश्वासात घेऊन सगळं कर. आणि पॉझिटिव्ह राहा. सगळं छान होईल"
तेव्हा पासून ती खूप रिलॅक्स झाली. जेव्हा जेव्हा भेटायची मन मोकळं करून जायची. हळू हळू तब्येतही सुधारू लागली. दर महिन्यातून एकदा औषध संपेल तशी आमची भेट व्हायची.
तेव्हा पासून ती खूप रिलॅक्स झाली. जेव्हा जेव्हा भेटायची मन मोकळं करून जायची. हळू हळू तब्येतही सुधारू लागली. दर महिन्यातून एकदा औषध संपेल तशी आमची भेट व्हायची.
काही दिवसांपूर्वी तिला जिने माझ्या कडे पाठवलं त्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला. "अगं तुझ्या ओळखीत कोणी सायकॅट्रिस्ट आहे का? मीरा चे वडील आले होते माझ्या कडे. त्यांना परवा रात्री छातीत दुखू लागलं. मी सेटल केलं त्यांना पण म्हणाले मीरा चं खूप टेन्शन आलय. तिला वेड लागलय. ती कोणा मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडलीय. एखाद्या चांगल्या डॉक्टर ला दाखवून तिची ट्रीटमेंट करायचं म्हणत होते. मी म्हटलं तुझ्या कानावर घालते कारण तू काउन्सिलिन्ग करतेस ना. तुझ्याच्याने काही होईल का?"
मला तर आश्चर्यच वाटलं. माणसं असाही विचार करतात याचं. प्रेम असं ठरवून कसं काय नष्ट करत येईल. धर्म निरपेक्ष भारताची २१ व्या शतकातली पिढी आंतरधर्मीय विवाहाला वेडसर पणा ठरवून कशी काय मोकळी होते ? धर्माचा फरक ही आपण ठरवू तितकी मोठी आणि छोटी गोष्ट. शेवटी आपण सगळीच हाडामासाची माणसं. मानवनिर्मित या धार्मिक विभाजनात माणूसच जास्त भरडला जातो. माझ्या आणि मैत्रिणीच्या संवादाला एक आठवडाही झाला नसेल तोच काल मीराचा फोन आला. तिचं लग्न ठरलंय.. तेही त्याच्याशीच.. त्याचंच आमंत्रण द्यायला. मला आश्चर्य वाटलं. पण तिच्या धाडसाचं कौतुक ही.
प्रवाहाच्या विरुद्ध जाताना तिला किती दडपण आलं असेल. पण ती हे सगळं आई बाबांना विश्वासात घेऊन करत होती म्हणून तिचं कौतुक. अजूनही बाबा तितकेसे राजी नव्हते. पण आई खम्बिर पणे पाठीशी आहे म्हणाली. तीचं ही बरोबरच आहे. समाज जो मागून पुढून नावंच ठेवणार त्याच्या साठी तिने आपल्या भावनांचा बळी का म्हणून द्यावा? आणि मुलगा शिकला सवरलेला जबाबदार आहे. हिची धर्मांतर न करण्याची अट त्याला मान्य आहे. सगळं कसं जुळून आलय धर्म सोडून. मीराला मी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा मीरा एकच वाक्य म्हणाली, "Doctor, you were the only person who understood me."
तेव्हा खूप पूर्वी वाचलेलं एक वाक्य आठवलं, "Ramzan Has Ram, Diwali Has Ali - Who Are We To Draw The Line?"
I wish this republic day we break the boundaries of religion and set our thoughts free. Wishing everyone..